विज्ञान



Preview

थोर शास्त्रज्ञ


१ ) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते.आपल्या आगळ्या कार्यपद्धतिमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपति' म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे पूर्ण नाव डॉ अबुल फकीर जैनुलाबदिनअब्दुल कलाम असे आहे. त्यांचे वडीलरामेश्वरमला येणार्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले. शाळेत असतनाच गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिलेे आणि तेव्हापासूनच डॉ. कलाम यांना पैशाचे महत्व पटले. या संस्थेतून एहोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी त्यांचे नाते जूळले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा' या प्रसिध्द संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणार्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) मध्ये दाखल झाले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करुन दाखविले. नंतर साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करुन घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, साधे व सरळ आहेत. त्यांना रुदवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभुषण', 'पद्यविभुषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. येत्या वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतित करुन विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.


२)विक्रम साराभाई
भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून विक्रम साराभाई ओळखले जातात.
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म
अमदावाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२
१९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक
उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय
व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ
टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू,
महात्मा गांधी आदी लोकांचे
त्यांच्या घरी जाणे-येणे होते.
विक्रम साराभाई यांच्या आई
सरलादेवी यांनी आपल्या ८
मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती.
या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण
युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले.
त्याना लहानपणापासुनच गणित
आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत
होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७
साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील
केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे
महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व
त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ
सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर
सी. व्ही. रामन
यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर
संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम,
कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत
असलेल्या प्रसिद्ध
नृत्यांगना मृणालिनी साराभाई
यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय
आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम
साराभाई ब्रिटनला गेले. १९४७
साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन
ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट
मिळवली आणि त्याचवर्षी ते
आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन
त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे
Physical Research Laboratory
ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते,
पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम
साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील
भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात
महत्त्वाची भूमिका बजावली.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट
अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम
साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर
मध्येच केली होती.
आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने
अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले.
या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम,
दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व
ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६
साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर
पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात
आले. दि. डिसेंबर ३१ १९७१ साली केरळ
राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच
ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन
झाले.

३)जोसेफ हेन्री



(जन्म : १७-१२-१७९७, मृत्यू : १८७८)
अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क
प्रांतातील
अल्बनी शहरानजीकच्या खेड्यामध्ये झाला.
बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. १३
व्या वर्षापर्यंत जेमतेम लिहिता-
वाचता येण्यापुरतेच शिक्षण झाले होते, पण नंतर
वाचनाची विलक्षण आवड निर्माण होऊन
त्यातूनच विज्ञानाची गोडी निर्माण
झाली. सतराव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण
करून शिक्षकाची नोकरी सुरू केली. स्वत: अनेक
प्रयोग करून विद्युत-चुंबकीय
प्रवर्तनासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. पहिले
विद्युत चुंबकीय तत्त्वावर चालणारे तारायंत्र
तयार केले, अमेरिकेतील स्मिथसोनियन
इन्स्टिट्यूटचा पहिला कार्यवाह.
याच्या स्मरणार्थ विद्युत-चुंबकीय
प्रवर्तनाच्या एककाला (युनिट) `हेन्री' हे नांव
दिले आहे.

४) सर मो.विश्वेश्वरैया

बालपण
यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील
चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार
जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते
श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मा यांचे अपत्य
होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात
होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व
हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य
होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर
नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील
प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते.
त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन
शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव
त्यांची आंध्र
प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण
विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे
असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब
हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन
मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण
चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण
बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन
बी.ए.ची परीक्षा पास झाले.स्थापत्य
अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण
त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे
येथे घेतले.
अभियंता म्हणून वाटचाल
अभियांत्रिकीमध्ये स्नातक
झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे
सार्वजनिक बांधकाम विभागात
नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे
महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन
क्षेत्रात पाटबंधार्यांची एक अतीशय क्लिष्ट
योजना राबविली.
त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण
द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट
घेतले जी सन १९०३ मध्ये
पहिल्यांदा पुण्याजवळील
खडकवासला धरणास लावण्यात आली.
ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर
आल्यावर धरणास कोणताही धोका न होता,
उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात
आलीत.या द्वारांच्या कामात
मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर
व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात
आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे
पूरापासुन संरक्षण
करण्यासाठी जी प्रणाली विकसित
केली त्याने त्यांना सत्कार
मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास
समुद्री पाण्यापासुन गंजरोधक
करण्याची प्रणाली तयार
करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर
के.आर.एस.धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते
उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख
केली.या धरणाचे बांधकामाने,ते
बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात
मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे,
'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले
जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे
नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील
म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक
प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील
वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक
इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल
युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंक ऑफ
मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे
अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर
दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व
एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले
जात होते. तिरुमला-
तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए
त्यांनी योगदान केले.
म्हैसूर येथे दिवाण म्हणून
सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,म्हैसूर
या भारतातील मोठ्या व
महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन
त्यांना,नियुक्त केल्या गेले. कृष्णराज वोडेयार
चतुर्थ
या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण
विकासासाठी निर्विवाद असे योगदान
दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये
बंगलोर येथील शासकीय
अभियांत्रीकी महाविद्यालय
याची त्यांनी स्थापना केली.ती भारतातील
एक प्रथम अभियांत्रीकी संस्था होती.
ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य
संस्था आहे.
विविध सन्मान
त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक
ते म्हैसूर येथे दिवाण
असतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे,
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन
एंपायर' या सन्मानाने
गौरविल्या गेले.भारताला स्वातंत्र्य
मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न'
या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने
गौरविल्या गेले.
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन
एंपायर' पदक
सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय
इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन
स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन
इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने
फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील
अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर'
ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन
गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स
काँग्रेस चे अध्यक्ष होते

५) डॉ. अनिल काकोडकर





(जन्म : नोव्हेंबर ११, १९४३)
डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध
अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूऊर्जा मंडळाचे
अध्यक्ष आणि भारत
सरकारच्या अणूऊर्जा विभागाचे प्रमुख
अधिकारी आहेत(सन २०११).
भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी होमी भाभा अणू
संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक
होते.

६) सतिश धवन


(जन्म : सप्टेंबर २५, १९२० मृत्यू : जानेवारी ३,
२००२)
सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन
कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान
होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन
कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई
यांच्यानंतर ISRO (Indian Space Research
Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले.
त्यांना भारतातील प्रायोगिक fluid
dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते.
त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण
भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण
शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite
Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.
त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार
उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar
Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प
यशस्वी करू शकला. त्यांच्या स्मरणार्थ
श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे
सतीश धवन अंतराळ केन्द्र असे नामकरण करण्यात
आले.

७) डॉ. जयंत नारळीकर



डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू
नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८
रोजी कोल्हापूर येथे झाला.
गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून
मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव
नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते.
वाराणशी येथील बनारस हिंदू
विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख
होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे.
तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून
मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर
ह्या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण
वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७
साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त
केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक
पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते
ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे
त्यांना बी.ए. एम.ए.
आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या.
त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी,
खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक
बक्षिसे मिळाली.
त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल
यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली.
सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने
प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड
यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ
थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी'
नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात
डॉ.
नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता.
१९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते.
सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल
शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर
त्या दोघांनी मिळून संशोधन करून
जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर
सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात
प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट
आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य
साधणारा असा हा सिद्धांत आहे.
हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे
अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व
कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.
दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण
झाल्यावर १९६६ साली नारळीकर
यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे
यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत -
गीता, गिरिजा व लिलावती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर
भारतातील खगोल शास्त्रातील
संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२
साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील
टाटा मूलभूत संशोधन
संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र
विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले.
कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील
आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.
डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर
आहेतच, पण त्याच बरोबर मराठी साहित्यात
त्यांनी फार मोलाची भर घातली.
विज्ञानकथांना त्यांनी मराठीत
चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य
माणसाला खगोलशास्त्र
समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख
आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार
माध्यमांचा ते उपयोग करतात.
त्यांच्या `यक्षांची देणगी' या पहिल्याच
पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
मिळाला आहे.मराठीच नव्हे, तर भारतातील
सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील
पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे
रचण्याचे कामही ते करीत आहेत.
त्यांच्या महान कार्याची दखल अनेक
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-
सन्मान प्राप्त झाले. १९६५
साली त्यांना पद्मभूषण तर २००४
साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले.
शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक,
एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच
ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स
जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले.
लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते
सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स
अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस
चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स
अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत
करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत
साहित्यिक लिखाण करून
विज्ञानाचा प्रसार
करण्यासाठीही त्यांना १९९६
साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन
त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते
संशोधन कार्यात मग्न आहेत. आज चार दशकांहून
अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष
विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे
अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.
त्याच बरोबर सतत पुस्तके
लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे.
सामान्य माणसाला खगोलशास्त्र
समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न
केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते
उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी'
या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र
शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार
१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
२००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार
मिळाला.
२०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी.
बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.
विज्ञानकथा पुस्तके
वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी
टाइम मशीनची किमया
याला जीवन ऐसे नाव
इतर पुस्तके
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
गणितातील गमतीजमती
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
नभात हसरे तारे

८) श्रीनिवास रामानुजन्


(जन्म : २२-१२-१८८७, मृत्यू : २६-०४-१९२०)
श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२,
१८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय
गणितज्ञ होते.
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन
यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे.
झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच
विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण
जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे
होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून
टाकत.
या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७
रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात
झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच
त्यांनी अभ्यासात
एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक
शाळेत दाखल करण्यात आले.
त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे
त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली.
माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये
आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून
त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन
मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात
१९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय
फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे
जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात
त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला.
१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज
ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो.
हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो.
हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने
रामानुजमनी त्यांच्याकडून
मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे
अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ
आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले
होते. लवकरच
रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते
१७ मार्च १९१४
रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४
ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात
रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले.
१९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले
सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस
वर्षांचे होते. त्यानंतर
त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप
मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले
भारतीय होत.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत
आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे
अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य
व्याधी त्यांना जडली होती.
वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी –
एप्रिल २६, १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे
जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ
भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण
गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली

९) लुई पाश्चर



(जन्म : २७-१२-१८२२, मृत्यू : २८-०९-१८९५)
फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. जन्म फ्रान्समध्ये
डोल नावाच्या गांवी. दूध आंबणे,
फळांच्या रसाची, द्राक्षरसाची आंबवून दारू
होणे यासारख्या रासायनिक प्रक्रिया मूलत:
काही सूक्ष्म जांतूंच्या (बॅक्टेरिया)
क्रियाशक्तीनेच घडून येतात
हा महत्त्वाचा शोध लावला.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे
होणाऱ्या `रेबीज' या प्राणघातक रोगावर
परिणामकारक लस शोधून काढली. सूक्ष्मजीव-
शास्त्राचा पाया याने घातला.

१०)जोहान केप्लर



(जन्म : २७-१२-१५७१, मृत्यू : १५-११-१६३०)
जर्मन ज्योतिर्विद. कोपर्निकस याने
मांडलेल्या सूर्यकेन्द्री विश्व-कल्पनेचा (सर्व ग्रह
आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरतात)
पाठपुरावा केला आणि सूर्याभोवती ग्रहांचे व
उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय
गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवले.
यासंबंधी केप्लरचे तीन नियम प्रसिध्द आहेत, ते
असे :
(१) प्रत्येक
ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा विवृत्तीय,
लंबगोलाकार असते. या लंबगोलाच्या दोन
केन्द्रांपैकी एका केन्द्राशी सूर्य असतो.
(२) ग्रह आणि सूर्य एका काल्पनिक रेषेने जोडले
तर ग्रहाच्या मार्गक्रमणात ही रेषा ठराविक
काळात ठराविक क्षेत्रफळ आक्रमते. याचाच
अर्थ जेव्हा ग्रह सूर्याचे जवळ
असतो त्यावेळी तो अधिक वेगाने मार्गक्रमण
करतो.
(३) ग्रह आणि सूर्य यांच्यातील
सरासरी (मध्यम) अंतराचा घन
हा त्या ग्रहाच्या सूर्याभोवतीचे
एका प्रदक्षिणा कालाच्या वर्गाच्या प्रमाणात
असतो. याचा अर्थ ग्रह जितका सूर्यास जवळ
तितका त्याचा प्रदक्षिणा काल (वर्ष) लहान
असतो.

११) सुनीता विल्यम्स् 




१२) होमी जहांगीर भाभा 





१३) जॉर्ज  स्टीफन्सन
















1 comment: